वाढती गुन्हेगारी

गुन्हेगारीत महाराष्ट्र नंबर १ वर, दोषी ठरवण्याचा दरही घसरला…

  • केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गुन्ह्यांचे प्रमाण सर्वाधिक असून देशात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुन्हेगारीत दोषी ठरवण्याचे प्रमाण हे २०२० मध्ये ५८.२९% इतके होते. ते २०२३ मध्ये ४१.३६ टक्क्यांवर घसरले आहे. सरकार गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आणि त्यांच्यावर खटला चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहे.

बालकांविरोधातील गुन्हेगारीत वाढ 

महाराष्ट्र सरकार बालकांचे रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे.

  • महाराष्ट्रातील बालकांविरोधातील गुन्ह्यांची संख्या २०१४ मध्ये ८,११५ होती. २०२३ मध्ये ती तब्बल २१,८०२ वर पोहोचली आहे. दर तासाला बालकांविरोधात दोन गंभीर गुन्हे घडतात. राज्यातील बालकांची सुरक्षा राखण्यात महायुती सरकार अपयशी ठरलं.

हिट-अँड-रन प्रकरणात वाढ

मद्यधुंद वाहनचालकांमुळे पादचारी आणि वाहनचालकांची सुरक्षा धोक्यात.

  • हिट अँड रन प्रकरणांमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे कल्याणीनगर पोर्शे घटना, वरळीतील मिहिर शाह बीएमडब्ल्यू   प्रकरण यासारखी अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणे आहेत. ज्यामध्ये आरोपी व त्यांच्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहेत.
  • रविवारी दि. ०८ सप्टेंबर मध्यरात्री भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे आणि त्याचे दोन मित्र अर्जून जितेंद्र हावरे (२४) आणि रोनित चिंतमवार (२७) धरमपेठमधील लाहोरी हॉटेलमध्ये गेले होते. मध्यरात्री साडेबाराला ते ऑडी मोटारीतून बाहेर पडले. सेंट्रल बाजार रोडवरुन भरधाव जात असताना सेंटर पॉईंट हॉटेलसमोर त्यांनी जीतू सोनकांबळे याच्या मोटारीसह तीन वाहनांना धडक दिली. 

न्याय मिळवणे झाले अवघड

  • जनतेला न्याय किती सुलभपणे मिळतो, याचा आढावा घेणार्‍या इंडिया जस्टिस रिपोर्ट नुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ मध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकाचे राज्य होते. पण महायुती सरकारच्या काळात २०२३ मध्ये महाराष्ट्र अकराव्या स्थानावर घसरले आहे.

अनुक्रमणिका