एसटी प्रवासाची दुरावस्था
चांगल्या प्रतीच्या बस गाड्या खरेदी करण्यात MSRTC अयशस्वी, खासगीकरणाकडे वाटचाल
- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) नवीन अद्ययावत बस खरेदी करण्यात येत नाहीत. परिणामी राज्यातील एसटी बस गाड्यांची अवस्था ही भंगारासमान झाली असून प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. एसटी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर खासगीकरण होत असल्याने सामान्य प्रवाशांच्या सुसज्ज प्रवासाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.
वाहतूक कोंडीमुळे महाराष्ट्रातील शहरांची जागतिक पातळीवर दखल
- ‘टॉमटॉम वाहतूक निर्देशांक २०२३’ जाहीर करण्यात आला. यात ६ खंडांतील जगभरातील ५५ देशांतील ३८७ शहरांचा समावेश आहे. या शहरांतील वाहतूक कोंडीची पाहणी करून त्यांची क्रमवारी करण्यात आली आहे. यात सर्वाधिक वाहतूक कोंडी असणाऱ्या जगातील आघाडीच्या शहरांमध्ये पुण्याने सातवा क्रमांक मिळवला आहे.
ट्रेन अपघातात वाढ, भाडेवाढीशी सामना
रेल्वे प्रवास असुरक्षित आणि महाग
- २०२३ मध्ये भारतात रेल्वे अपघातात ३७% वाढ झाली आहे, तर २०१३ ते २०२२ पर्यंत रेल्वे भाड्यात १०७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. स्लीपर कोचमध्ये कपात करण्यात आली आहे, तर नॉन-एसी डब्यांच्या तिकीट दरात वाढ झाली आहे. सर्वसामान्य रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षित असणा-या डब्यांमध्येही मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून मोठ्या त्रासातून प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. वंदे भारतसारख्या अव्वाच्या सव्वा दर आकारणा-या एक्स्प्रेस गाड्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. परंतु सर्वसामान्यांसाठी असणा-या एक्स्प्रेस गाड्यांमधील दुरावस्था मात्र कायम आहे. आजच्या घडीला रेल्वे प्रवास धोकादायक आणि महाग झाला आहे. प्लॅटफॉर्म तिकीटामध्येही ५ रुपयांची वाढ करून १० रुपये करण्यात आले.
रेल्वे स्थानकांचा विकास रखडलेलाच.
अमृत भारत स्टेशन योजना अयशस्वी
- अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत महाराष्ट्रातील १२३ रेल्वे स्थानके अद्ययावत करायची होती, पण ही घोषणा हवेतच विरुन गेली. बहुतांश स्थानकांवर अजूनही पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहे या मूलभूत सुविधांचा अभाव आहे.
उडान योजना फसली
विमानतळ विकास रखडला, ऑपरेशनल विमानतळांचा वापर कमी झाला
- २०१९ मध्ये UDAAN योजनेत सहभागी होणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. परंतु राज्यातील ९ पैकी फक्त ६ विमानतळच कार्यान्वित झाले आहेत. जळगाव, गोंदिया आणि सिंधुदुर्ग यांसारख्या विमानतळांवर अद्याप कमीत कमी विमान उड्डाणे होत आहेत. त्यामुळे या विमानतळांचा वापर नागरिकांसाठी होण्याऐवजी विमानतळांच्या देखभाल दुरुस्तीवरच सर्वाधिक पैसे खर्च होत आहेत.
पायाभूत सुविधांच्या नावाखाली जनतेची फसवणूक
मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा खर्च वाढला, कामालाही विलंब
- महाराष्ट्रात १५० कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपैकी तब्बल ६६% प्रकल्पांना पूर्ण होण्यास विलंब होत आहे, परिणामी या प्रकल्पांवरील अतिरिक्त खर्च हा एकूण २०,००० कोटी रुपयांहून अधिक झाला आहे. मुंबई-नागपूर, मुंबई-पुणे, मुंबई-कोकण यासारखा शहरातील प्रवास हा वेगाने व्हावा यासाठी बुलेट ट्रेन नाही पण गुजरातमधील अहमदाबादला लवकर पोहचता यावे यासाठीच मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचा आग्रह धरण्यात आला.
निकृष्ट दर्जाच्या कामांची गॅरंटी.
महायुतीकडून नागरिकांचा जीव धोक्यात घालण्याचं काम.
- मोठ्या थाटात महायुतीकडून घाईघाईने प्रसिध्दीसाठी अपूर्णावस्थेतील समृध्दी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले. डिसेंबर २०२२ पासून ते १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत तब्बल १,२८२ अपघातात १३५ प्रवाशांचा मृत्यू झाला. अवघ्या दोन वर्षातच महामार्गावर चिरा पडल्या असून, रस्त्याच्या मधूनच रॉड बाहेर आले असून समृध्दी महामार्गाची मोठी दुरावस्था झाली आहे. मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या अटल सेतूवरील रस्ता अवघ्या ५ महिन्यात खचला. कोस्टल रोडच्या उद्घाटनानंतर आठवड्याभरातच गळती लागली. यातून कोस्टल रोडच्या उभारणीत गलथान कारभार झाल्याचं स्पष्ट होतं. कोट्यवधी रुपये खर्च करून २ वर्षानंतर बांधण्यात आलेल्या मुंबईतील गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी फसल्याचे उघड झाले. कोकणात चिपळूण येथील बांधकामाधीन पूल कोसळल्याची घटना घडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरापासून काही अंतरावर मेट्रोच्या कामातील लोखंडी सळ्या थेट वाहनात घुसून अपघात झाल्याची घटना घडली. मुंबई नाशिक महामार्गावरील खड्ड्यामुळे प्रवाशांना दररोज नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
भाजपला इलेक्टोरल बॉण्ड देणाऱ्या कंपनीलाच महाराष्ट्रात कंत्राटं.
भाजपला ९६६ कोटींची देणगी देणाऱ्या मेघा इंजीनिअरिंग कंपनीला मिळालेली महाराष्ट्रातील कामे.
- मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बीकेसी स्थानक उभारणी.
- एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पाच्या दोन पॅकेजेसची तब्बल १२ हजार ५७ कोटी रुपयांची कामे.
- सिडको पाणीपुरवठा योजनेच्या बोगद्याचे १,०३० कोटींचे कंत्राट.
- एमएमआरडीएच्या वर्सोवा-भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील बोगद्यांची ६ हजार कोटींची कामे.
- मुंबई महापालिकेच्या पश्चिम उपनगरांतील १०६ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कोट्यवधी रुपयांच्या कामाचे कंत्राट.
रस्त्यांची झालीये चाळणी, महामार्ग होईनात पूर्ण
- अठरा हजार कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या अटल सेतूला जोडण्यासाठी बनवण्यात आलेल्या रस्त्यावर पाच महिन्यातच भेगा पडल्याचे दिसून आले. यामुळे कामाच्या गुणोत्तर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. तसेच आर्थिक फायद्यासाठी महायुती सरकार काय करू शकते ते दिसून येते.
- देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत १०० कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या गोखले पुलाच्या दोन्ही बाजू खाली-वर होऊन त्यात ६ फुटांचे अंतर निर्माण झाल्याने महायुती सरकारची फजिती झालीये. आता हे काम पुन्हा करण्याची नामुष्की निर्माण झालिये.
- मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे (NH ६६) काम मागील दहा वर्षांपासून रखडले असून, यामुळे कोकणातील जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. अगोदर ४०० कोटी अपेक्षित खर्चात हे काम पूर्ण होणार होते, तो खर्च आता १५,००० कोटींवर गेला आहे